Tuesday, 9 July 2019


विद्याकाकू (२)

मालती वहिनींच्या माहेरीपण असेच ऐश्वर्य. जमीन जुमला होत. त्या तिकडे पण मोठ्या आनि इकडे पण मोठ्या. मोठेपणाची आणि तो मिरवायची एक झिंग त्याना चढली होती. सगळ काही मि च करेल. स्वयंपाक घर चोवीस तास मिच सांभाळेल. आलागेला मिच पाहील. शेताच्या हिशोबात सुध्दा त्या बरीच ढवळाढवळ करायच्या. शेतमालाचा पैसा प्रत्यक्ष कोणाच्याच हाती येत नव्हता. दाजी, माधव भाऊजी आणि हे अस तिघ मिळून बॅंकेत अकाऊंट होते. तिघांच्या सहीशिवाय पैसा निघत नसे. आणि दाजीनी अजूनही कर्ते पण सोडलेले नव्हतेप्रत्येक गोष्ट त्यांच्या सल्ल्यानी आणि हिशोबानीच व्हायची. नलिनीच लग्न हा पूर्णपणे दाजींचाच निर्णय होता. मुलगा बघण्यापासून ते दागदागीने घडविण्या पर्यंत दाजींच्याच इच्छेला मान दिल्या गेला होता. माधव भाऊजी सतत काहीतरी विचारात असतात अस मला वाटत रहायच. मालती वहिनींचा फटकळ स्वभाव, दाजींची मार्जी सांभाळण मुलीच लग्न ठरल तरी निर्णयाचा अधिकार नसण ह्या गोष्टींचा ते विचार करतात का असा मी विचार करायची. 

ह्यांचा तर प्रश्नच नव्हता. त्याना काही मत असेल अस मला वाटतच नाहीअगदीच अबोल स्वभाव. घुमट पणाकडे  झुकणारा.  त्यात आम्हाला मुलबाळ न झाल्याने एक पडते पणाच सावट सतत आमच्यात असायच. मनावर ओझ घेऊन आम्ही वावरायचो. दोष कोणातच नव्हता पण आमचा योग नव्हता. ते स्वत: कधी खळखळून हसले नाही त्यामुळे हळूहळू मी पण हसण विसरत गेले. आणि आता हरवून बसले. बोलून बोलू तर कोणाशी? नलिनी शालिनेव अगदी काळजा जवळ पण वहिनीना आवडत नव्हत त्यानी जास्त काकू काकू केलेल. कधीतरी मला रागाच्या भरात वांझोटी म्हणून वहिनी मोकळ्या झाल्या होत्या. त्याना माझ मन किती दुखावल ह्याची जाणीव नसेल पण मी ह्या जन्मात ते विसरू शकणार नाहीय. आत्ताही टचकन डोळे भरून आले माझे.  आता नलिनीच लग्न होत आहे. उद्या जाऊन ह्या मुलींवर अशी वेळ आली तर? ह्या तिला वांझोटी म्हणून हिणवतील का? 


जागच्या जागी दचकले मी. मुलींसाठी माझ्या मनात असे विचार आलेच कसे?  मी फाडकन स्वत: च्या गालात मारून घेतल.


घरात धान्याच्या गोण्या येऊन पडायच्या.माझ माहेर यथातथा असूनही माहेरी जाताना कधी चार दाणे तू माहेरी नेतेस का असा प्रश्न इतके वर्षात एकदाही आला नव्हता.  पण सुमती वहिनी मात्र दरवेळेस धान्य न्यायच्या. वास्तवीक मुंबईत धान्य साठवायला जागा नसायचीआणि संजय भाऊजी शेतात खपतही नव्हते. मालती वहिनींच्या माहेरी गरज नव्हती आणि   त्यांचे भाचर दर उन्हाळ्यात इथे असायचे.

माझ्या मनाची घुसमट दिवसेंदिवस वाढतच चालली होती.  बोलायला मन मोकळ करायला जागा नव्हतीदर महिन्यात चार दिवस वेगळ बसायची वेळ यायची. हे अतिशय कुचकट वागायचे बोलायचे त्या दिवसात. काम करणार्या बाई सारख ताट  एकदम सगळ वाढून खोलीत पाठवून दिल्या जायच. मला फार रडायला यायच. त्या चार दिवसात मी अजूनच एकलकोंडी व्हायची. त्यात आत्याबाईंचे कुत्सीत हसणारे डोळे. 

मग मी मनातल्या मनात सगळ्याना खूप बोलून घ्यायचे. अगदी दाजीना सुध्दाआणि सगळे खाली मान घालून माझ बोलण चुपचाप ऐकतात आहेत असही स्वप्न बघायचे. सगळे खजील असायचे. त्याना पश्चात्ताप झालेला असायचा. मला अस वागवल्या बद्दल ते खूप दिलगिर असायचेमग सगळे माझ्याशी चांगल वागायला लागायचे.

ह्या दिवा स्वप्नातल एक स्वप्न हे ही होत की मी मालती वहिनीनिंच्या कुशीत शिरून रडते आहे आणि त्या मला अगदी प्र्व्माने समजावतात आगे की नलिने शालेव्न्वव तुझ्याच मुली आहेत.


पण ह्या स्वगतातल एखाद वाक्य चुकूनहेव माझ्या तोंडून निघाल की घरात शितयुध्द सुरू व्हायच. वातावरण पार  बिनसून जायचदोघी मोठ्या जावा कट केल्यासारख्या मला एकट पाडायच्या. मी  अक्षम्य अपराध केल्या सारखी घरभर वावरायचे. कामाला हात लाऊ द्यायचा नाही. मोकळ बोलायच नाही. स्वत:हून कधी बोलायच नाही. मुलीना धाकत ठेवायच. वेळ आलीच तर बैठकीत विषय जायचा.

दाजींकडून मी फार अपेक्षा केली होती की त्यानी एकदा तरी माझी बाजू समजून घ्यावी आणि ती उचलुइन धरावी. पण कधीही त्यानी त्यांच्या अधिकाराचा वापर ह्या साठी केला नव्हता . मी म्हणेल ती पूर्वदिशा .. हा अलिखित नियम मालती वहिनी कसोशीने पुढे सरकवत होत्या.

No comments:

Post a Comment