Friday, 5 July 2019

#वाडाचिरेबंदी७


विद्या काकू (१) 

नलिनीची भेदरला क्गेहरा डोळ्यासमोरून हलत नव्हता तिला विचारल तुझ्या जवळ झोपू का तर मालती वहिनींचा चेहरा बदलला. तिनी पण आईचा कल बघून नको म्हंटल. 

असच व्हायच माझ पण सुरूवातीला. सतत ते डोळे पाठलाग करतात अस वाटायचअगदी रात्री सुध्दा ते आमच्यात आहेत अस वाटायच. सुखाने न्हाऊन निघतानाच्या क्षणी एक विचित्र परके पण माझ्या मनावर यायच. आणि मी त्या फोटोतल्या डोळ्यात हरवून जायचे.   आत्ता पर्यंत इतकी समरस असलेली बायको एकदम का आक्रसते म्हणून ह्याना चिड यायची. त्यानी विचारलही मला एकदा. मग दुसरा दिवस भर चिड चिड करायचे. वाट्टेल तसे अपमान करायचे. नवीन लग्न झालेल माझ मी फारच खजील व्हायचे. एकदा तर रात्री त्यानी मला तसच बाजुइला करून विचारल की माझ इतर कोणावर प्रेम आहे का? मी स्वप्नातही हा विचार करू शकत नव्हते.   त्या रात्री मी त्याना सांगायचा प्रयत्न केला की मला आत्याबाईंच्या डोळ्यांची भोती वाटते. 

आणि मग सुख हरवून गेल. हे पण एका ओझ्याखाली दबून जवळ यायचे. काळ पुढे सरकत गेला. वांझोटे पणाच दु:ख कायमच नशीबाला जुळलआणि ते डोळे हळू हळू आमच्या संसारातून दूर झाले. दिवस भर शेतात काबड कष्ट करून थकलेला नवरा रात्री जवळ येईनासा झाला. कधीतरी वहिनी मला वांझोटी म्हणाल्या... त्या रात्री रडत त्यांच्या कुशीत शिरायचे होते... तर त्यानी पण घाव घातला होता.

"बिज अंकुरायला माती सुपीक हवी न."

झाडाझुडूपांची काळजी घेणारा माणूस शेतीतल्या पिकांची मशागत करणारा माणूस एका क्षणात माझ्या मुळावर घाव घालून मोकळा झाला होता.

घरात आले तेंव्हा जेमतेम २० वर्षांच वय होत माझ. घरात सतत राबता. येणारा जाणारा पाहूणा कायमचाच. ऱोज निदान सहा सात पान जास्तीचे पडायचे पंगतीला. माझ्या माहेरी गरीबीइथे अमाप ऐश्वर्य. जमीनदार घराण. दाजी साहेब अतिशय दिलदार आणि लोकप्रिय व्यक्तीमत्वकुणीही आजवर त्यांच्या बद्दल चुकूनही वाईट बोललेल मी ऐकल नव्हत. 

मालती वहिनी माधव भाऊजी 
सुमती वहिनी आणि संजय भाऊजी.
मालती वहिनी मोठ्या असूनही सुमती वहिनींचा वरचष्मा मला जाणवायचा. घरातले कुठलेच काम आपली जवाबदारी म्हणून त्यानी स्विकारले नव्हते. सुमती वहिनी अतिशय धोरणी. प्रत्येक  गोष्टीत स्वत:च हित जपायच्या. आणि ते जपताना टोकाच्या स्वार्थी व्हायच्या. 

मालती वाहिनी घरातली जवाबदारी आणि मोठेपणाच्या ओझ्याखाली कायम पिचलेल्या. कोणी काही म्हणेल का? नाव ठेवतील का? ह्या धाकात चोवीस तास वावरायच्या. स्वत: ला फक्त चांगल सिध्द करायच्या प्रयत्नात भरपूर चुका करून स्वत:च्या आयुष्यातल छोट्या छोट्या गोष्टीतल सुखही घालवून बसलेल्या. मोठे पणाचा ताठा इतका की कोणी दुखावल जात आहे ह्याची त्याना पर्वा नसायचीत्यांच लग्न झाल तेंव्हा चार लहान दिर, कुळकुळाचार, सणवार, आला गेला पाहूणा प्रत्ये गोष्टीची जवाबदारी त्यानी अगदी लहान वयात समर्थ पणे पेलली होती. त्यामुळे दाजींची सगळी भिस्त त्यांच्यावर असायची.

माझ लग्न झाल तेंव्हा नलिनी शालीनी  लहान  लहान गोड मुली होत्यासुमती वहिनी गर्भारमुलीना साहजीकच  नवीन काकू  म्हणून माझ कौतूक. सतत मागे पुढे पिंगा घालायच्या. कितीदा रात्री जवळ झोपू दे चा हट्ट करायच्या. मग झोपल्या की माधव भाऊजी त्याना उचलून न्यायचे आमच्यातून. मी मुलीना जीव लावते म्हणून ह्याना फार आवडायच. 

 ते जीव लावण मग कायमचच झाल.   आमच मुल झालच नाही.

किती वर्ष दोघींची शाळेची तयारी, वेण्या घालून देण शाळेत सोडण हे काम मी आपल्या मनाने स्वत:कडे घेतलेल होत. सुमती  वहिनी पहीलटकरीण म्हणून बाळंतपणाला माहेरी गेल्या. त्याना प्रदीप झाला. तो लहानपणापासूनच अतिशय डांबरट होता. मुल अशेच असतात ह्या नावाखाली त्याचा सगळा दांडगट पण  खपवून घेतल्या जायचा. 

हे अतिशय अबोल. माधव भाऊजी आणि दाजींसोबत शेतात जायचे.  संजय भाऊजीना अपंग म्हणून घरी दारी भरपूर सवलती मिळाल्या होत्या. गावतल्या सरकारी शाळेत मास्तर होते तेभरपूर पगार आणि शिकवण्या.  सुमती वहिनी भाऊजींच्या जेवणा पुरत्या स्वयंपाक घरात यायच्या. त्यांच माहेर मुंबई च. त्यामुळे ह्या भरल्या घरात , खेडेगावत जुळवून घेताना त्याना खूप जड गेल होत.



No comments:

Post a Comment